Dharma Sangrah

महाराष्ट्रासह चार राज्यांमधील नागरिकांना कर्नाटकात 31 मे पर्यंत प्रवेश नाही

येडियुरप्पा सरकारने जाहीर केला निणर्य

Webdunia
मंगळवार, 19 मे 2020 (12:24 IST)
महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत  म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
 
येडियुरप्पा यांनी असेही सांगितले की, लॉकडाउनच्या नियमांची काटेकोर अंलबजावणी केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकाने बंद असतील. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असेही तंनी सांगितले.
 
लॉकडाउन 4 मध्ये राज्यातल्या बसेस आणि खासगी बसेसना संमती देण्यात आली आहे. या बसेसमध्ये एकावेळी फक्त 30 माणसे असतील. मास्क लावणे आणि डिस्टन्सिंग पाळणे हे महत्त्वाचे असेल. एकाही बसचे तिकिट वाढवले जाणार नाही.
 
ऑटो किंवा टॅक्सी सेवाही सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र राज्याच्या सीमा ओलांडता येणार नाहीत. ऑटो किंवा टॅक्सी यामध्ये चालकास एकूण तिघांनाच बसण्यासाठी संमती देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाउन चारच्या कालावाधीत राज्यातील सर्व दुकानेखुली करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यामधील लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments